Advertisement

लोकलनं पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रवास


लोकलनं पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रवास
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ महिने बंद असलेली लोकल सोमवारपासून पून्हा रुळावर आली. लोकल सुरू झाल्यानं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सुमारे अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या लोकलमधून पहिल्या दिवाशी ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेल्या लोकलमधील प्रवाशांच्या रेल्वेपासाला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

पश्चिम रेल्वेवर पहिल्या दिवशी सुमारे ३० हजार प्रवाशांना प्रवास केला. सोमवारी उपनगरी रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू रोड स्थानकांतील एकूण ५६ तिकिट खिडक्यांमधून ३,५२१ तिकिटांची विक्री झाली. १,४६६ प्रवाशांनी नवीन पास घेत प्रवास केला, तर १९० प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली.  यात सहामाही आणि वार्षिक पास असलेल्या प्रवाशांचा देखील समावेश आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकातील ४१ तिकिट खिडक्यांवरून १२,००० तिकिटांची विक्री झाली. पहिल्या दिवशी मध्य रेल्वेवर सुमारे २०,००० प्रवाशांनी प्रवास केला.

प्रवाशांच्या तपासणीसाठी रेल्वे स्थानकांवर सुमारे १,२५० जवान तैनात करण्यात आले होते. तसंच, ५५० तिकीट तपासणीस ही स्थानकांत नियुक्त करण्यात आले. सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळं लोकल बंद असल्यानं जितके दिवस प्रवाशांना प्रवास करता आला नाही. त्या दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. यासाठी नवीन पास प्रवाशांना देण्यात येईल. हा पास संबंधित रेल्वे स्थानकातील तिकिट खिडक्यांवरून प्रवाशांना मिळेल. हे केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी असेल.

पश्चिम रेल्वे

  • पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू मार्गावर एकूण ७३ गाड्या धावणार आहेत. 
  • ८ गाड्या या विरार आणि डहाणू रोड या स्थानकादरम्यान धावणार आहेत.
  • अनेक लोकल गाड्या चर्चगेट ते विरारपर्यंत धावणार आहे. 
  • काही लोकल गाड्या या डहाणूपर्यंत धावणार आहेत.
  • चर्चगेट ते बोरिवली दरम्यान काही जलद लोकल सुरु धावणार आहे. 
  • बोरिवलीनंतर त्या पुढील स्थानकात धिम्या गतीने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

  • मध्य रेल्वेवर लोकलच्या एकूण २०० सेवा चालवल्या जाणार आहे. 
  • १०० अप मार्गावर आणि १०० डाऊन मार्गावर लोकल धावणार आहेत.
  • सीएसएमटी ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या स्थानकादरम्यान १३० लोकल धावणार आहेत. 
  • यामधील ६५ या अप, तर उर्वरित ६५  या डाऊन मार्गावर धावणार आहेत.
  • काही प्रमुख स्थानकांवर या लोकल थांबवल्या जातील.

लोकल प्रवासाचे नियम

  • लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. 
  • सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करता येणार नाही.  
  • या प्रवाशांना तिकीटासाठी तिकीट खिडक्या उघडल्या जाणार आहे. 
  • संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्याला तिकीट मिळणार आहे. 
  • पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्यांना स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. 
  • कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. 
  • जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत. त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. 
  • कंटेन्मेंट झोनमधून कर्मचारी कामावर येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  • ट्रेनमध्ये तसेच लोकलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रेल्वे स्टेशन परिसरात 150 मीटरपर्यंत ना फेरीवाला आणि नो पार्किंग क्षेत्र असणार आहे.
  • प्रत्येक स्टेशनबाहेर इमर्जन्सी सेवा म्हणून रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे.



हेही वाचा -

अखेर शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू, मार्गदर्शक तत्वे लवकरच

सुशांतच्या मत्यूचा त्याच्या वहिनीला धक्का, झालं निधन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा