कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ महिने बंद असलेली लोकल सोमवारपासून पून्हा रुळावर आली. लोकल सुरू झाल्यानं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सुमारे अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या लोकलमधून पहिल्या दिवाशी ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेल्या लोकलमधील प्रवाशांच्या रेल्वेपासाला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
पश्चिम रेल्वेवर पहिल्या दिवशी सुमारे ३० हजार प्रवाशांना प्रवास केला. सोमवारी उपनगरी रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू रोड स्थानकांतील एकूण ५६ तिकिट खिडक्यांमधून ३,५२१ तिकिटांची विक्री झाली. १,४६६ प्रवाशांनी नवीन पास घेत प्रवास केला, तर १९० प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली. यात सहामाही आणि वार्षिक पास असलेल्या प्रवाशांचा देखील समावेश आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकातील ४१ तिकिट खिडक्यांवरून १२,००० तिकिटांची विक्री झाली. पहिल्या दिवशी मध्य रेल्वेवर सुमारे २०,००० प्रवाशांनी प्रवास केला.
प्रवाशांच्या तपासणीसाठी रेल्वे स्थानकांवर सुमारे १,२५० जवान तैनात करण्यात आले होते. तसंच, ५५० तिकीट तपासणीस ही स्थानकांत नियुक्त करण्यात आले. सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळं लोकल बंद असल्यानं जितके दिवस प्रवाशांना प्रवास करता आला नाही. त्या दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. यासाठी नवीन पास प्रवाशांना देण्यात येईल. हा पास संबंधित रेल्वे स्थानकातील तिकिट खिडक्यांवरून प्रवाशांना मिळेल. हे केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी असेल.
पश्चिम रेल्वे
मध्य रेल्वे
लोकल प्रवासाचे नियम
हेही वाचा -
अखेर शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू, मार्गदर्शक तत्वे लवकरच
सुशांतच्या मत्यूचा त्याच्या वहिनीला धक्का, झालं निधन