कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु केल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी क्यु-आर कोड आधारित पास सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची माहिती एकत्र करण्यात राज्य सरकारकडून विलंब होत आहे. त्यामुळे सध्या क्यु-आर कोडशिवाय प्रवासास संधी देण्यात आली आहे. क्यु-आर कोड मिळवण्याची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. मात्र, १० ऑगस्टनंतर क्यूआर कोड शिवाय प्रवास करता येणार नाही.
मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेरील अत्यावश्यक प्रवाशांसाठी हा 'क्यूआर कोड' पास बंधनकारक असणार आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरु करण्याचे ठिकाण, कार्यालयाच्या वेळा आणि अन्य तपशील यांची माहिती एकत्र करण्याचे काम राज्य सरकारने सुरु केलं आहे. मात्र, कमी कर्मचाऱ्यांमुळे हे काम त्वरीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने हा पास मिळेपर्यंत ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.
हेही वाचा