Advertisement

देशातंर्गत विमान वाहतूक २५ मे पासून सुरू

दोन महिन्यांनंतर विमान सेवा सुरू होणार असल्य़ाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.

देशातंर्गत विमान वाहतूक २५ मे पासून सुरू
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसह देशातंर्गत विमान वाहतूकही बंद आहे. मात्र, आता विमान वाहतूक सुरू होणार आहे. २५ मेपासून देशातंर्गत विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. सर्व विमानतळांना वाहतुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.

दोन महिन्यांनंतर विमान सेवा सुरू होणार असल्य़ाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. प्रवाशांसाठीही लवकरच नियमावली जाहीर केली जाईल, असं  केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून सांगितलं.

दरम्यान, विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढचे काही महिनेतरी कमीत कमी समान घेऊन जावं लागणार आहे. म्हणजे फक्त एकच बॅग न्यावी लागेल. तसंच विमान तळावर प्रवासाच्या काही तास आधीच पोहोचावं लागेल. तपासणीसाठी प्रवाशांना रांगेत आणि खुणा केलेल्या जागेवर उभं रहावं लागेल. विमानात चढण्यापूर्वी आणि उतरल्यानंतर प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल.  

विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासनामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. विमान प्रवासासाठी प्रवाशांना वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येण्याची शक्यता आहे. तसंच प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्ह्ज दिले जातील, असंही सूत्रांकडून सांगण्यात येतंय. पण नियमावली आल्यावरच याबाबत अधिक स्पष्टता येईल.



हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा