वाहतूक कोंडिवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं आता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून आता मिरा भाईंदर ते डोंबिवलीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पानंतर मुंबईचे पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर खाडीमार्गे जाेडले जाईल.
मुंबई-अलिबाग जलवाहतुकीसाठी सध्या कॅटमरान प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर भाईंदर ते डोंबिवलीपर्यंत ही वाहतूक सेवा सुरू होईल. एका लाँचमधून किमान १०० प्रवासी प्रवास करू शकतील. चार ठिकाणी या कॅटमरानला थांबा देण्यात आला आहे. कोलशेत, काल्हेर, गायमुख यासह ४ स्थानके असतील.
मीरा-भाईंदर ते डोंबिवलीपर्यंतचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मीरा-भाईंदर ते डोंबिवली दरम्यान राहणाऱ्या लोकांना वाढत्या वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार असल्याचं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं. सध्याच्या काळात मीरा-भाईंदर ते डोंबिवलीपर्यंत जाण्यासाठी सुमारे अडीच तास लागतात. तथापि, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही वेळ ४० मिनिटांपर्यंत कमी केली जाईल.
प्रकल्पामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, असं अस्लम शेख म्हणाले. जलमार्गाचा उपयोग केल्यास ३३ टक्के इंधनाची बचत होईल आणि प्रदूषण सुमारे ४२ टक्क्यांनी कमी होईल.
हेही वाचा