ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अनेकदा सहप्रवासी जोरजोरात फोनवर बोलत असल्याचा किंवा स्पीकरवर गाणी लावून ऐकत असल्याचा त्रास तुम्हीही अनुभवला असेलच.
कर्कश आवाजातील ती गाणी आणि फोनवरचं बोलणं त्रास होत असतानाही भांडण टाळण्यासाठी अनेकदा दुर्लक्षित केलं जातं. पण यापुढे अशा बेशिस्त प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. कारण रेल्वेने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेने नवी नियमावली प्रसिद्ध केली असून यामध्ये प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. रेल्वे मंत्रालयाकडे अनेक प्रवासी लोक फोनवर मोठ्यानं बोलतात आणि हेडफोनशिवाय गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असताना या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
रेल्वेने यावेळी वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
भारतीय रेल्वेची नवी नियमावली
रेल्वेनं नव्या आदेशात तिकीट तपासनीस, आरपीएफ, कॅटरिंग आणि कोच अटेंडंटसह ऑन-बोर्ड ट्रेन कर्मचार्यांना डब्यांमध्ये प्रवेश करण्याचे आणि प्रवाशांना सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याचे आदेश दिले आहेत.
“या कामात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत विनम्रपणे वागण्याची सूचना करण्यात आली असून तक्रारीला कोणतीही जागा ठेवू नये असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
हेही वाचा