Advertisement

यंदाही पावसाळ्यात लोकल विस्कळीत होणार?


यंदाही पावसाळ्यात लोकल विस्कळीत होणार?
SHARES

दरवर्षी पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची लाइफलाईन विस्कळीत होते. रेल्वे मार्गावरील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. त्यामुळं रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असूनस काही लोकल उशिरानं धावतात. त्यामुळं पावसाळ्यापपूर्वी रुळांवर पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करत असतात. मात्र, यंदाही पावसाळ्यापूर्वीच्या कामाचं वेळापत्रक मांडण्यात आलं आहे. परंतु, टाळेबंदीमुळं रेल्वे हद्दीतील पावसाळापूर्व कामांना ब्रेक बसला आहे. 

पश्चिम व मध्य रेल्वेवर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असतं. परंतु ती यंदा मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. टाळेबंदी उठताच मर्यादित दिवसांत पावसाळापूर्व कामं पूर्ण करणं आणि लोकल वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पावसाळापूर्व कामांचे नियोजन हे पालिके च्या मदतीने हाती घेतले जाते. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार दरम्यान ५३, तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ७९ छोटे-मोठे नाले आहेत. 

काही नाल्यांची सफाई पालिकेच्या मदतीनं करण्यात येते. त्याशिवाय ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी स्थानक, दादर, माटुंगा रोड ते माहीम, वांद्रे ते खार स्थानक, अंधेरी ते जोगेश्वरी, वसई ते विरार पट्टा आणि मस्जिद स्थानक ते दादर, माटुंगा ते घाटकोपर, मुलुंड ते कळवा, बदलापूर ते अंबरनाथ हे सखल भाग आहेत. नालेसफाईबरोबरच या सखल भागातील रुळांची उंची वाढवणे, त्यासाठी रुळांखाली मोठ्या प्रमाणात खडी टाकणे, स्लीपर्स बसवणे इत्यादी कामे पावसाळ्याच्या आधी केली जातात. 

संपूर्ण मार्गावरील रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायरची तांत्रिक कामे, रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, रुळांशेजारचा कचरा उचलणे इत्यादी कामं असतात. मार्चअखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामांना सुरुवात होऊन ती जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतात.

१४ एप्रिलपासून सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे ती पूर्णपणे थांबलेली आहेत. या कामांसाठी रेल्वे कर्मचाऱ्याबरोबरच कं त्राटी कामगारही लागतात. मात्र करोनाच्या धास्तीने शहरातील मजूर वर्गाने मोठय़ा प्रमाणात शहराबाहेर स्थलांतर के ले आहे. त्यामुळे रेल्वेकडे ही कामे करण्यासाठी सध्या मनुष्यबळ नाही.

पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, हे कामगार टाळेबंदीनंतरही पुन्हा कधी येतील, हे सांगता येणे कठीण आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि मुंबई ते पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्पच झाली, तर माथेरान मिनी ट्रेनचा मार्गही वाहून गेल्याने ही सेवाही बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. पश्चिम रेल्वेलाही फटका बसला होता.



हेही वाचा -

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा