Advertisement

भविष्यात रेल्वे प्रवाशांना पनवेल ते कर्जत प्रवास करणं शक्य होणार

एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेनं (एआयआयबी) कर्ज मंजूर केलं आहे.

भविष्यात रेल्वे प्रवाशांना पनवेल ते कर्जत प्रवास करणं शक्य होणार
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भविष्यात प्रवाशांना पनवेल ते कर्जत प्रवास करणं शक्य होणार आहे. पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्ग यासह विरार ते डहाणू चौपदरीकरण इत्यादी एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना ३ हजार ५०० कोटी रुपयांचे आर्थिक बळ मिळणार आहे.

एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेनं (एआयआयबी) कर्ज मंजूर केलं आहे. याबाबत मुंबई रेल्वे विकास महामंडळानं माहिती दिली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई रेल्वे विकास महामंडळ, एआयआयबीत कर्ज पुरवठ्यासंदर्भात सोमवारी करार झाला. हे कर्ज एकूण ३० वर्षांच्या कालावधीकरिता असणार आहे. यामुळं प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

एमयूटीपी-३ ला चालना मिळण्यासाठी राज्य सरकारचेही सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी जुलै महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली होती.

एमयूटीपी-३ मधील प्रकल्प व खर्च

  • पनवेल ते कर्जत दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका- २,७८३ कोटी रु.
  • ऐरोली ते कळवा दरम्यान उन्नत रेल्वे मार्ग- ४७६ कोटी रु.
  • विरार ते डहाणू रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण -३,५७८ कोटी रु.
  • ४७ वातानुकू लित लोकल- ३,४९१ कोटी रु.
  • दोन स्थानकांतील रूळ ओलांडणाऱ्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना- ५५१ कोटी रु.
  • तांत्रिक साहाय्य- ६९ कोटी रु.



हेही वाचा -

मुंबईची लोकल ट्रेन कधी सुरू होणार? वडेट्टीवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा