मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ ९ ऑगस्टला मुंबईत येऊन धडकणार आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी होणार असल्याने त्याचा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
भायखळा ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग असून या वादळाच्या तडाख्यात अजाणतेपणे कुणीही सापडू नये, याची दक्षता घेण्याची सूचना मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने सर्वच वाहनचालकांना दिली आहे.
मराठा क्रांती मोर्चाला जीजामाता उद्यान, भायखळा येथून सकाळी ११ वाजता सुरूवात होईल. त्यानंतर हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून खडा पारसी पुतळा, नेसबिट जंक्शन, जे.जे. उड्डाणपूलमार्गे आझाद मैदान गाठेल. सायंकाळी ५ वाजता मोर्चाची सांगता होईल.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोर्चेकरी मुंबईत येऊन दाखल होत असल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. त्यातच मुंबईतील वाहतूक यंत्रणेवर या मोर्चाचा ताण पडू नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजनाच्या उद्देशाने सकाळी ९ वाजेपासूनच महत्त्वाचे बदल केले आहेत.
सविस्तर माहिती येथे घ्या -
Traffic arrangements to minimise inconvenience to citizens, during the silent morcha tomorrow from Byculla to Azad Maidan b/w 9 am-5 pm pic.twitter.com/hEwr4NqtsJ
— Mumbai Police (@MumbaiPolice) August 8, 2017
हे देखील वाचा -
मराठा मोर्चासाठी मुंबई सज्ज! महापालिकेच्या विशेष सुविधा...