Advertisement

मुंबई-जालना-कोल्हापूरसाठी नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार?

केंद्र सरकार आता वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.

मुंबई-जालना-कोल्हापूरसाठी नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार?
SHARES

देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत गाड्या धावत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आता वंदे भारत ट्रेन अधिक मार्गांवर सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेक शहरे या ट्रेनशी जोडली जाणार असून लाखो रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

आता देशभरात 10 वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. यातील एक ट्रेन सिकंदराबाद ते पुणे दरम्यानही धावणार आहे. ही गाडी दक्षिण मध्य रेल्वेला देण्यात येणार आहे.

सध्या दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत चार वंदे भारत गाड्या धावत आहेत. वंदे भारत गाड्या उपलब्ध झाल्यास सर्व श्रेणीतील प्रवाशांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत एकूण 33 ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. जे सध्या देशभरातील विविध शहरे आणि राज्यांमध्ये सुरू आहेत.

याशिवाय मुंबई-कोल्हापूर, मुंबई-जालाना, पुणे-वडोदरा, वाराणसी-लखनौ, पाटणा-जलपायगुडी, मडगाव-मंगलोर, दिल्ली-अमृतसर, इंदूर-सुरत, टाटानगर-वाराणसी दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, 15 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी आणि नवी दिल्ली दरम्यान पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. या रेल्वेचा या मार्गावरील लाखो प्रवाशांना फायदा झाला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मार्गावर दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू करू शकतात, असे बोलले जात आहे. दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन असेल.

यासंदर्भात रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले असून काही बोगद्यांचे अंतिम टप्प्याचे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे.



हेही वाचा

विरार स्टेशनवर 'या' 'ट्रेन्सला अतिरिक्त थांबा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई बीएमसीने थांबवला, कारण...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा