बातमी आहे मुंबई लाईव्हच्या ईम्पॅक्टची. कुलाब्यातल्या भादवा समुद्रकिनार पट्टीवर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केल्यावर मोठया प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत मुंबई लाईव्हनं वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल अखेर पालिका प्रशासनानं घेतलीय. पालिका प्रशासनाच्या ए वॉर्ड विभागातर्फे समुद्रकिनाऱ्याची साफसफाई करण्यास सुरुवात झालीय. बुलडोझरच्या साहाय्यानं समुद्रकिनाऱ्यावरील कचरा उचलण्याचं काम सुरु आहे.