अंधेरी - विसर्जनानंतर मुंबईतल्या अनेक समुद्र किना-यावर गणेशमूर्तीचे तुटलेल्या अवस्थेत अवशेष सापडतात. त्यावेळी मात्र गणेशभक्त आपल्या बाप्पाला विसर्जित करण्यासाठी पुढे येत नाही. पण ही बाब लक्षात घेऊन मनसे वर्सोवा विधान सभेतील वर्सोवा समुद्र किनारी वाहून आलेल्या मूर्तींच्या अवशेषांचे पुन्हा विसर्जन करण्यात आले. मनसे सरचिटणीस सौ.शालिनी ताई ठाकरे यांच्या पुढाकाराने आणि विभाग अध्यक्ष संदेश देसाई तसंच महिला विभाग अध्यक्षा वैष्णवी घाग ,संतोष घाग ,संतोष सोनावणे असे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.