वांद्र्यातल्या बॅंड स्टँड परिसरात 6 दिवसांच्या गौरी-गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त केला होता. शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून गौरी-गणपतींचं विसर्जन करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. तसंच गणपती विसर्जनासाठी छोट्या तयार करण्यात आल्या होत्या. समुद्राच्या भरतीमुळे मुंबई पोलिसांनी समुद्रात नागरिकांना उतरण्यास मनाई केली होती.