वांद्र्यातील मलबार हिल परिसरातल्या काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याचा फटका तिथल्या नागरिकांना होत आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी रिंगिग असोसिएशनच्यावतीनं बैठक बोलावण्यात आली. तसंच परिसरातल्या नागरिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरवठा करणार असल्याचं आश्वासन नगरसेविका सुषमा शेखर यांनी दिलं आहे. या बैठकीला रिंगिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. के. वाघेला, नगरसेविका सुषमा शेखर, विनोद शेखर, अजय मकवाना उपस्थित होते.