दरवर्षी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारतात. यावर्षीही तीच परंपरा कायम राहणार आहे, होय, या वर्षीही प्रीपेड प्लॅन महागणार आहेत, त्यामुळे तुमचे बजेट बिघडणार आहे. एका अहवालानुसार, Jio, Airtel आणि Vodafone Idea उर्फ Vi सारख्या कंपन्या दिवाळीपर्यंत त्यांच्या प्लॅनच्या किमती 10 ते 12 टक्क्यांनी वाढवू शकतात.
याचा अर्थ या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2022 मध्ये दरवाढ दिसून येईल. विश्लेषकांच्या मते, या दरवाढीमुळे कंपन्यांचा सरासरी महसूल प्रति वापरकर्ता (ARPU) 10 टक्क्यांनी वाढेल, ज्याचा फायदा कंपन्यांना होईल.
अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ झाल्यानंतर, Airtel, Jio आणि Vodafone Idea (Vi) चे ARPU अनुक्रमे 200 रुपये, 185 रुपये आणि 135 रुपये असतील. मजबूत 4G नेटवर्कमुळे, विश्लेषकांना अपेक्षा आहे की रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोघांच्याही ग्राहकांमध्ये २०२३ मध्ये वाढ होईल.
या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी मागच्या वेळीही टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या, त्यानंतर सोशल मीडियावर त्याचा प्रचंड विरोध झाला होता आणि कंपन्यांना युजर्सच्या नाराजीलाही सामोरे जावे लागले होते. मात्र, असे असतानाही बाजारात नवीन किमतीसह योजना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
इतकेच नाही तर दूरसंचार कंपन्या त्यांच्या 28 दिवसांच्या प्लॅनबद्दलही खूप चर्चेत होत्या. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार केली होती की, कंपन्या एका महिन्याच्या नावावर केवळ २८ दिवसांच्या वैधतेचे प्लॅन देत आहेत, जे चुकीचे आहे. यानंतर, TRAI च्या आदेशानुसार, Airtel, Jio आणि Vi ने बाजारात M महिन्याची वैधता असलेले प्लॅन लाँच केले आहेत.
हेही वाचा