Advertisement

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट- रघुराम राजन

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आर्थिक संकट असल्याचं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट- रघुराम राजन
SHARES

देशात कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषीत केला आहे. यामुळे संपूर्ण देशातील व्यवहार, उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असल्याचं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी ही या संकटाकडं लक्ष वेधलं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आर्थिक संकट असल्याचं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे, असाही सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.

देशात करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल त्यांनी ब्लॉग लिहिला आहे. ब्लाॅगमध्ये त्यांनी सरकारला पुढील संकटाबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.  रघुराम राजन यांनी ‘Perhaps India’s Greatest Challenge in Recent Times’ या शिर्षकाने ब्लॉग लिहिला आहे. राजन यांनी म्हटलं की, स्वातंत्र्यानंतर भारतासमोरचं हे कदाचित सर्वात मोठं संकट आहे. २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटावेळी मागणीत खूप मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पण तेव्हा कामगार कामावर जात होते. कंपन्या नफ्यामुळे मजबूत होत्या. देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत होती. पण आज जेव्हा आपण करोना व्हायरसशी लढा देत आहोत तेव्हा यापैकी कोणतीच गोष्ट आपल्याकडे नाही.

सरकारने गरिबांवर खर्च करण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे. गरज नसलेला खर्च टाळला पाहिजे. जर आपण करोनाचा पराभव नाही करु शकलो, तर लॉकडाउननंतर काय होणार याबद्दल आत्ताच योजना आखली पाहिजे. अधिक काळ देशात लॉकडाउन ठेवणं शक्य नाही, असं राजन यांनी म्हटलं आहे.

राजन यांनी म्हटलं की, करोनानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने योजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे. सध्या सरकारला खूप काही करण्याची गरज आहे. सरकारने ज्यांच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे अशा लोकांना बोलावलं पाहिजे. भारतात असे अनेक लोक आहे जे सरकारला अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यात मदत करु शकतात. सरकार राजकारणाच्या सीमा ओलांडून विरोधी पक्षाची मदत घेऊ शकतं, ज्यांच्याकडे जागतिक आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा अनुभव आहे. 



हेही वाचा -

आरोग्यंमत्र्यांनी दिली तबलिगी नेत्यांना समज, म्हणाले...

मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क न केल्यास कठोर कारवाई, मुंबई महापालिकेचा इशारा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा