Advertisement

भिवंडी इमारत दुर्घटना : ३७ जणांचा मृत्यू, सर्च ऑपरेशन अद्याप सुरू

भिवंडीमध्ये रविवारी रात्री तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेती मृतांचा आकडा ३७ वर पोहोचला आहे.

भिवंडी इमारत दुर्घटना : ३७ जणांचा मृत्यू, सर्च ऑपरेशन अद्याप सुरू
SHARES

भिवंडीमध्ये रविवारी रात्री तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३७ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत २५ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी म्हणजेच २० सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. गेल्या ५० तासांपासून बचावकार्य सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रात्रीची वेळ असल्यानं इमारीत राहणारे सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे २५ कुटुंबातील ७० ते ८० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. महत्त्वाची बाब म्हणजे मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलं आहेत.

भिवंडीत घडलेल्या इमारत दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या निर्देशानुसार मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये तर जखमींचा मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

भिवंडीतील इमारत दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आपत्ती मदत पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. वडेट्टीवार यांनी सांगितलं की, 'जर ही इमारत लीगल असेल, तर मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल. तसेच जखमींना पन्नास हजार रुपये देखील जाहीर करण्यात आले आहेत.

शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. मात्र ३५ वर्षात खरंतर इमारत कोसळायला नको होती, परंतु इमारत कोसळली आहे. त्यामुळे नोटीस देऊन देखील त्यांनी इमारत रिकामी का केली नाही? याचीही चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार येईल.', असं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा

मेट्रो-३ प्रकल्पातील भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार

१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा