पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार अखेर देशव्यापी लाॅकडाऊन (lockdown 4) ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने (National Disaster Management Authority (NDMA)) याबाबतची घोषणा केली. यासंदर्भातील नवीन नियमावली केंद्र सरकारच्या गृह विभागाने (Ministry of Home Affairs (MHA)) रविवार १७ मे रोजी रात्री जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार ३१ मे पर्यंत शाळा-कॉलेज बंदच राहणार असून मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चौथ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन यासोबतच बफर आणि कंटेन्मेंट झोन असे ५ झोन पाडण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या घोषणेआधीच महाराष्ट्र आणि तामिळनाडू सरकारने लाॅकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काही दिवसांपूर्वी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करतानाच लाॅकडाऊनचा पुढचा टप्पा १७ मे आधी घोषित करण्यात येईल, असं सांगितलं होतं. या वेळच्या लाॅकडाऊनचे नियम, अटी-शर्थी वेगळ्या असतील, असं देखील नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीवर नजर टाकूया.
MHA issues order to further extend #lockdownindia till 31.05.2020, to fight #COVID19
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) May 17, 2020
New guidelines have permitted considerable relaxations in #Lockdown4 restrictions. States to decide various zones, taking into consideration parameters shared by @MoHFW_INDIA#IndiaFightsCOVID19 pic.twitter.com/AeMHvowaaH
नवे नियम पुढीलप्रमाणे:
हेही वाचा - महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवलं, ठाकरे सरकारचा निर्णय
National Disaster Management Authority (NDMA) asks Ministries/ Departments of Government of India, State Governments and State Authorities to continue the lockdown measures up to 31st May 2020. pic.twitter.com/tn0i85kVSK
— ANI (@ANI) May 17, 2020
काय सुरु राहील? (कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्थींवर परवानगी)
काय बंद राहील?
हेही वाचा - सल्ला केंद्राला मिरची झोंबली दुसऱ्यांना, पृथ्वीराज चव्हाणांना श्री काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन बंदी