मुंबईत कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मीरा-भाईंदरचा परिसर या वाढत्या कारणामुळे बंद आहे. तथापि, पालिका अधिकाऱ्यांनी काही भागात लॉकडाऊन क्षिथील केलं आहे. त्यानुसार शनिवार, ९ मे २०२० पासून शहरातील या भागातील हार्डवेअर, ऑप्टिशियन आणि इलेक्ट्रॉनिक दुकानं खोलण्याची परवानगी देण्यात आली होती.
२० एप्रिल २०२० पासून मीरा-भाईंदरमध्ये कडक बंद पाळण्यात आला होता. पालिका अधिकाऱ्यांनी फक्त अत्यावश्यक सेवा चालवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता काही सेवांना सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
मीरा-भाईंदरचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मिरर ऑनलाईनला सांगितलं की, नागरिकांची सोय लक्षात घेऊन निर्बंध कमी करण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीच्या कामास परवानगी देण्यात आली आहे.
८ मे २०२० पर्यंत या भागातून १९२ रुग्ण आढळले आणि दोन जणांचा मत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील एकूण प्रकरणांची संख्या १२ हजाराच्या वर गेली आहे. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भांव रोखण्यासाठी पालिका सर्व प्रयत्न करत आहे.
हेही वाचा