Advertisement

मुंबईत कोरोनाचे १२५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू

शनिवारी दिवसभरात ८८८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख २७४९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे  १२५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी कोरोने ३४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शनिवारी दिवसभरात १२५४  नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-तुमच्या आशीर्वादामुळेच मी वाचले, नवनीत राणांनी मानले आभार

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४८रुग्ण दगावले आहेत. तर १४ आँगस्ट रोजी ४६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १३ आँगस्ट रोजी एकूण ४८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय शनिवारी मुंबईत कोरोनाचे १२५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २७ हजार ७१६ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ८८८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख २७४९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-महेंद्र सिंग धाेनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

राज्यात आज ६८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६१४ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६  हजार ४०९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ४४ हजार ९७४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १२,६१४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२५४ (४८), ठाणे- १९२ (१८), ठाणे मनपा-१८४ (७),नवी मुंबई मनपा-४४७ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२९६(११),उल्हासनगर मनपा-२० (७), भिवंडी निजामपूर मनपा-३६ (३), मीरा भाईंदर मनपा-१४४ (१०), पालघर-२१६ (१२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-३७६ (३), पनवेल मनपा-१६०(६), नाशिक-२१४ (४), नाशिक मनपा-७८३ (६), मालेगाव मनपा-६४, अहमदनगर-२३२ (१),अहमदनगर मनपा-१३५, धुळे-२०६ (२), धुळे मनपा-१५१ (३), जळगाव-४१९ (६), जळगाव मनपा-७९ (२), नंदूरबार-७८ (२), पुणे- ४५८ (२५), पुणे मनपा-१११४ (३४), पिंपरी चिंचवड मनपा-७९१ (१४), सोलापूर-३०९ (३), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-३९० (३), कोल्हापूर-३४४ (१२), कोल्हापूर मनपा-२६२ (१), सांगली-११६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०९ (४), सिंधुदूर्ग-७ (२), रत्नागिरी-१२३ (४), औरंगाबाद-१२९ (२),औरंगाबाद मनपा-१४७ (२), जालना-४४ (१०), हिंगोली-३२, परभणी-२२, परभणी मनपा-३१, लातूर-९० (२), लातूर मनपा-९२ (२), उस्मानाबाद-१७० (४), बीड-११२ (५), नांदेड-७३, नांदेड मनपा-४१, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती-२५, अमरावती मनपा-५३ (१), यवतमाळ-६१, बुलढाणा-६७ (२), वाशिम-३९, नागपूर-१९२ (१), नागपूर मनपा-७३९ (१८), वर्धा-१७, भंडारा-२७ (१), गोंदिया-३४, चंद्रपूर-३३, चंद्रपूर मनपा-१२ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १७ (१).

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा