Advertisement

मुंबईत कोरोनाचे १७३५ नवे रुग्ण, ३३ जणांचा दिवसभरात मृत्यू

शनिवारी दिवसभरात ८९६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख २२ हजार ५६७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे १७३५ नवे रुग्ण, ३३ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी कोरोने ३१२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शनिवारी दिवसभरात १७३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३३ रुग्ण दगावले आहेत. तर ४ आॅगस्ट रोजी ३७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ आॅगस्ट रोजी एकूण ३५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे १७३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ५३ हजार ७१२ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ८९६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख २२ हजार ५६७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-कंगनासोबत माझं व्यक्तीगत भांडण नाही, पण..., संजय राऊत पुन्हा बोलले

राज्यात आतापर्यंत एकूण ६ लाख ३६ हजार ५७४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.१ टक्के आहे. आज १० हजार ८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख २०  हजार ६६१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४५ लाख ५६ हजार ७०७ नमुन्यांपैकी ८ लाख ८३ हजार ८६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ८१ हजार ९०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार १९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले २०,४८९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३१२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१७३७ (३३), ठाणे- २८६ (९), ठाणे मनपा-३३५ (२), नवी  मुंबई मनपा-४१३ (४), कल्याण डोंबिवली मनपा-४३५ (१), उल्हासनगर मनपा-३३, भिवंडी निजामपूर मनपा-५ (२), मीरा भाईंदर मनपा-२६२ (४), पालघर-२४२ (२), वसई-विरार मनपा-२०३ (२), रायगड-६४९ (५), पनवेल मनपा-२६३ (४), नाशिक-२५७ (१०), नाशिक मनपा-५६६ (५), मालेगाव मनपा-५४ (१), अहमदनगर-५०८ (८),अहमदनगर मनपा-२७९ (७), धुळे-१३१ (४), धुळे मनपा-५४ (१), जळगाव- ४३६ (६), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-१०८ (१), पुणे- १३४५ (५), पुणे मनपा-२३६६ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९५३ (७), सोलापूर-६१९ (७), सोलापूर मनपा-८४ (१), सातारा-९३९ (१३), कोल्हापूर-४८४ (१५), कोल्हापूर मनपा-२३० (३), सांगली-४६२ (५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-४२६ (६), सिंधुदूर्ग-९५, रत्नागिरी-१९१ (२), औरंगाबाद-१६७,औरंगाबाद मनपा-२३१ (९), जालना-१३४ (३), हिंगोली-६९, परभणी-७२ (२), परभणी मनपा-४४ (१), लातूर-२४० (६), लातूर मनपा-१९१ (१), उस्मानाबाद-२४० (६), बीड-२०६ (४), नांदेड-१९६ (७), नांदेड मनपा-१५८ (८), अकोला-७६ (२), अकोला मनपा-४५(१), अमरावती- १९, अमरावती मनपा-६५, यवतमाळ-१४० (७), बुलढाणा-६९ (२), वाशिम-७८, नागपूर-३८८ (४), नागपूर मनपा-१३४२ (२७), वर्धा-१०९ (४), भंडारा-१८५ (४), गोंदिया-१४५, चंद्रपूर-१८६ (३), चंद्रपूर मनपा-१३७ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य- २५ (२).

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा