Advertisement

मुंबई २२३६ कोरोनाचे नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू

रविवारी दिवसभरात ५०३८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ४७ हजार ८०७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबई २२३६ कोरोनाचे नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात रविवारी कोरोने ४५५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात २२३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४४ रुग्ण दगावले आहेत. तर १९ सप्टेंबर रोजी ५० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १८ सप्टेंबर रोजी एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २२३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ८४ हजार ३१३ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ५०३८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ४७ हजार ८०७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रॉयल चॅलेंजर्सची नवी जर्सी

राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २६ हजार ४०८ एवढ्या उच्चांकी संख्येने  रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. आज नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २० हजार ५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ८४ हजार ३४१ वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९१ हजार २३८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

दरम्यान, जालन्याच्या १०७ वर्षीय आजीबाईंच्या पाठोपाठ आज कल्याण येथे १०६ वर्षांच्या आजीबाईही कोरोनाला हरवत ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील जम्बो रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झालेल्या आजीबाई रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत ‘आनंदी’ चेहऱ्याने घरी परतल्या. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५८ लाख ७२ हजार २४१ नमुन्यांपैकी १२ लाख ८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५८ टक्के) आले आहेत. राज्यात  १८ लाख  ४९ हजार २१७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे.


आज निदान झालेले २०,५९८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२०९ (४४), ठाणे- ३१३ (५), ठाणे मनपा-४०४ (६), नवी  मुंबई मनपा-३६२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-४७८ (१४), उल्हासनगर मनपा-६५ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (४), मीरा भाईंदर मनपा-२०४ (५), पालघर-१८४ (१), वसई-विरार मनपा-२६७ (३), रायगड-४१४ (६), पनवेल मनपा-२७१ (२), नाशिक-२५८ (९), नाशिक मनपा-६२० (४), मालेगाव मनपा-४३, अहमदनगर-६७८ (१४),अहमदनगर मनपा-२११ (२), धुळे-६४ (१३), धुळे मनपा-२७(८), जळगाव-६९२ (७), जळगाव मनपा-१४८ (५), नंदूरबार-११२, पुणे- १२२० (२९), पुणे मनपा-१७७४ (३७), पिंपरी चिंचवड मनपा-७३२ (१०), सोलापूर-६१६ (५), सोलापूर मनपा-८१ (१), सातारा-७७० (१४), कोल्हापूर-५५३ (८), कोल्हापूर मनपा-१८१ (३), सांगली-५२४ (१२), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३२१ (४), सिंधुदूर्ग-४५, रत्नागिरी-८३ (२२), औरंगाबाद-९१ (१६),औरंगाबाद मनपा-३९७ (५), जालना-१०९ (१), हिंगोली-८८ (१), परभणी-४६ (१), परभणी मनपा-४१ (१), लातूर-२२२ (१३), लातूर मनपा-११८ (५), उस्मानाबाद-१२२ (१७), बीड-१७१ (६), नांदेड-१५८ (२), नांदेड मनपा-२७७ (१), अकोला-३७ (१), अकोला मनपा-१०१ , अमरावती-८८ (४), अमरावती मनपा-१५२ (१), यवतमाळ-२७० (१), बुलढाणा-१९४ (१), वाशिम-१२० (१), नागपूर-५३५ (१९), नागपूर मनपा-१६१२ (३५), वर्धा-१३८ (१), भंडारा-१५० (९), गोंदिया-२२४ (१), चंद्रपूर-१४३ (२), चंद्रपूर मनपा-५५, गडचिरोली-५५ (३), इतर राज्य- २२ (१).

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा