Advertisement

मुंबईत कोरोनाचे ५८७ नवे रुग्ण, ३५ जणांचा दिवसभरात मृत्यू

मंगळवारी दिवसभरात ८८३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ११ हजार ९६७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ५८७ नवे रुग्ण, ३५ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मंगळवारी कोरोने ३२९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ५८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३५ रुग्ण दगावले आहेत. तर २३ आॅगस्ट रोजी ३६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २४ आॅगस्ट रोजी एकूण  २० जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे ५८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ३७ हजार ६७८ इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात ८८३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ११ हजार ९६७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात तब्‍बल ५७.७६ टक्‍के वाढ

राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५  हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख २४ हजार ९११ नमुन्यांपैकी ७ लाख ०३ हजार ८२३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८९ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ५३ हजार २७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १०,४२५ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२९ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-५८७ (३५), ठाणे- १०५ (३), ठाणे मनपा-१४३ (९), नवी मुंबई मनपा-३०२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-९४ (२), उल्हासनगर मनपा-१३ (५), भिवंडी निजामपूर मनपा-१३, मीरा भाईंदर मनपा-९२ (४), पालघर-८६, वसई-विरार मनपा-५५ (३), रायगड-१४८ (३५), पनवेल मनपा-६९, नाशिक-१७० (१), नाशिक मनपा-६७५ (७), मालेगाव मनपा-५, अहमदनगर-२५६ (५),अहमदनगर मनपा-२०६ (३), धुळे-३६, धुळे मनपा-६ (१), जळगाव- ४७६ (६), जळगाव मनपा-१४३ (६), नंदूरबार-१०७, पुणे- ४५८ (१३), पुणे मनपा-१२२८ (३६), पिंपरी चिंचवड मनपा-८४२ (९), सोलापूर-३०५ (२), सोलापूर मनपा-४० (२), सातारा-४८९ (८), कोल्हापूर-३५८ (२०), कोल्हापूर मनपा-१३२ (१७), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२२९ (१०), सिंधुदूर्ग-७४, रत्नागिरी-४६, औरंगाबाद-१७४ (६),औरंगाबाद मनपा-२३७ (१५), जालना-३२ (१), हिंगोली-६, परभणी-५०, परभणी मनपा-३३ (१), लातूर-८१(६), लातूर मनपा-८४ (२), उस्मानाबाद-१०५ (७),बीड-१२२ (३), नांदेड-१२९, नांदेड मनपा-१४ (१), अकोला-२२ (१), अकोला मनपा-१४, अमरावती-४२, अमरावती मनपा-४०, यवतमाळ-८४, बुलढाणा-२७ (१), वाशिम-७, नागपूर-१८४ (३), नागपूर मनपा-६०५ (२१), वर्धा-५०(१), भंडारा-४९ (२), गोंदिया-३४, चंद्रपूर-४२ (१), चंद्रपूर मनपा-३० (१), गडचिरोली-२४, इतर राज्य ७.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा