Advertisement

मुंबईत कोरोनाचे ९७९ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू

शुक्रवारी दिवसभरात ९०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १८६१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाचे ९७९ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गुरूवारी कोरोने ३६४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ९७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४७रुग्ण दगावले आहेत. तर १२ आँगस्ट रोजी ५० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १३ आँगस्ट रोजी एकूण ४८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे ९७९  नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २८ हजार ५५० इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ९०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १८६१  रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Gunjan Saxena The Kargil Girl review : 'ती'च्या स्वप्नांची गरुडझेप

राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के  एवढे आहे. आज १२ हजार ६०८ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१  हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १२,६०८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३६४ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७९ (४७), ठाणे- १९८ (५), ठाणे मनपा-२२३ (१९),नवी मुंबई मनपा-३९३ (१३), कल्याण डोंबिवली मनपा-२९४(४),उल्हासनगर मनपा-२६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१३ (४), मीरा भाईंदर मनपा-८८ (२), पालघर-१५० (५), वसई-विरार मनपा-१९६ (७), रायगड-३२८ (८), पनवेल मनपा-१३७ (१), नाशिक-१८५ (७), नाशिक मनपा-६८८ (११), मालेगाव मनपा-६८ (१),अहमदनगर-३८१ (१),अहमदनगर मनपा-२१० (४), धुळे-१६४ (१), धुळे मनपा-१४५ , जळगाव-४५० (६), जळगाव मनपा-१३० (६), नंदूरबार-१५, पुणे- ५२३ (३१), पुणे मनपा-११९२ (५६), पिंपरी चिंचवड मनपा-९०६ (१३), सोलापूर-३४६ (३), सोलापूर मनपा-११३ (२), सातारा-२४१ (७), कोल्हापूर-४१९ (८), कोल्हापूर मनपा-३१३ (६), सांगली-११७ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०६ (१६), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-१६२ (४), औरंगाबाद-१४५ (५),औरंगाबाद मनपा-२४७ (४), जालना-९७ (१), हिंगोली-४४ (१), परभणी-८ (१), परभणी मनपा-३३, लातूर-११७ (२), लातूर मनपा-५६ (२), उस्मानाबाद-१९१ (४), बीड-७४ (९), नांदेड-७१ (४), नांदेड मनपा-७६ (१), अकोला-४१ (१), अकोला मनपा-१३, अमरावती-६३ (१), अमरावती मनपा-९९ (१), यवतमाळ-११५, बुलढाणा-१०२ (२), वाशिम-७५(१), नागपूर-१५१ (२), नागपूर मनपा-६१५ (१६), वर्धा-२७, भंडारा-२४, गोंदिया-२१ (१), चंद्रपूर-२३ (१), चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१०, इतर राज्य २४.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा