मुंबई - ५०० आणि १००० च्या नोटांवर घातलेल्या बंदीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि मुंबई पालिकेच्या निवडणूकीवर होणार असल्याचा दावा केला जातोय. पालिका निवडणुकीमध्ये जो पैसा वापरला जातो तो बहुतांशी काळा पैसा असल्याचे मानले जाते, त्यामुळे राजकीय पक्षांना धोका निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केलाय. दरम्यान भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी मोदीसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होणार असल्याचे म्हटलंय. तर अबू आझमी यांनी यामुळे जास्त फायदा होईल असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिलीय.