Advertisement

जानेवारी, फेब्रुवारीत ३३,७९९ बेरोजगारांना रोजगार

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये ३३,७९९ उमेदवारांना रोजगार मिळाल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

जानेवारी, फेब्रुवारीत ३३,७९९ बेरोजगारांना रोजगार
SHARES

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये ३३,७९९ उमेदवारांना रोजगार मिळाल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. गेल्या वर्षी अशा विविध उपक्रमांमधून राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळाला होता.

चालू वर्षात जानेवारी महिन्यात २० हजार ७१३ बेरोजगारांना, तर फेब्रुवारी महिन्यात १३ हजार ८६ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.

यासंदर्भात नवाब मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केलं आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. 

हेही वाचा- गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महापालिकेचे कठोर निर्देश!

त्याचबरोबर विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येतं. राज्यात या विविध उपक्रमांना बेरोजगार उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोकरी इच्छुक तरुणांनी महास्वयंम वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी, आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसंच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

मुंबईत ६,१८७८ बेरोजगारांना रोजगार

फेब्रुवारी २०२१ मध्ये विभागाकडे ३५ हजार ९१८ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई (mumbai) विभागात १० हजार ४८१, नाशिक विभागात ४ हजार ७७३, पुणे विभागात ११ हजार १४२, औरंगाबाद विभागात ५ हजार ६९२, अमरावती विभागात १ हजार ३४६ तर नागपूर विभागात २ हजार ४८४ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

फेब्रुवारीमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ८६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार ८७८, नाशिक विभागात १ हजार ३५३, पुणे विभागात ३ हजार ८९३, औरंगाबाद विभागात ६९५, अमरावती विभागात १४५ तर नागपूर विभागात १२२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा