Advertisement

ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा बंद

23 एप्रिलपासून अनेक भाग प्रभावित

ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) ने 23 एप्रिलपासून 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे. गुरुवार, 23 एप्रिल दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवार, 24 एप्रिल दुपारी 12 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (Maharashtra Industrial Development Corporation) सुरू असलेल्या अत्यावश्यक तांत्रिक दुरुस्ती आणि सुधारणा कामांमुळे करण्यात येत आहे.

या कालावधीत दिवा आणि कळवा भागात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंब्रा भागातही बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद असेल, मात्र प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही भागांना याचा अपवाद असेल. तसेच वागळे इस्टेट आणि माजीवाडा-मानपाडा परिसरातील कोलशेत खालचा गाव भागातही पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

या बंदमागील कारण म्हणजे जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरातील बारवी ग्रॅव्हिटी चॅनेल क्रमांक 1, 2 आणि 3 वर MIDCकडून महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेची दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता लक्षात घ्यावी आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



हेही वाचा

मुंबईतील 'या' भागांमध्ये 18 तास पाणीपुरवठा बंद

मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतरही कन्सोर्टियम कायम

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा