
मुंबई (mumbai), ठाणे (thane) आणि पालघर (palghar) या जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस 'यलो अलर्ट' (yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यात 2 जुलै रोजी मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जून महिना सुरू होऊनही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सातही धरणांतील पाणीसाठा खालावला आहे.
मुंबईच्या धरणातील पाणीसाठा आता 7 टक्क्यांपेक्षा कमी उपलब्ध आहे. या परिस्थितीमुळे धरणांतील पाणीसाठ्याने मुंबईची चिंता वाढवली आहे.
जून महिन्यात सरासरी 400 मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा जून महिन्यात पावसाने आपले तोंड दाखवलेले नाही.
अल् नीनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला आहे. जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
