Advertisement

मुसळधार पावसामुळं भाजीपाला महागला

परतीच्या पावसामुळं शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळं भाजीपाला महागला
SHARES

परतीच्या पावसामुळं शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळं पिकांचं नुकसान झाल्यानं भाज्यांची आवक घटली असून, मुंबईतील किरकोळ आणि घाऊक बाजारातील दर कडाडले आहेत. कांद्याच्या दरवाढीपाठोपाठ आता इतर भाज्याही महागल्या आहेत. पावसापूर्वीचे भाज्यांचे घाऊक दर आणि सध्याचे घाऊक दर यात बरीच मोठी तफावत आहेत. यात ग्राहकांसोबतच भाजी विक्रेत्यांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे.

कोरोनामुळं आर्थिक गणित बिघडलेलं असताना आता भाजीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसापूर्वी फरसबी, पापडी, फ्लॉवर, गवार, शिमला मिरची यांचे घाऊक बाजारातील दर प्रतिकिलो ८० रुपये होते. त्यानंतर मालाची आवक घटली आणि हे दर अनुक्रमे १२०, १००, १००, १२०, १०० रुपये प्रतिकिलो झाले.

भाजी विक्रेत्यांना कोबी आणि गाजर प्रतिकिलो ५० रुपये दरानं खरेदी करता येत होते. हे दर अनुक्रमे ३० आणि २० रुपयांनी वाढले. टोमॅटो ३० रुपयांवरून ४० रुपये, भेंडी ६० रुपयांवरून ८० रुपये, वांगे ४० रुपयांवरून ७० रुपये प्रतिकिलो घाऊक दरापर्यंत पोहोचले आहे. सध्या घाऊक ६४ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी तिखट मिरची आता ८० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

सर्वसाधारण परिस्थितीत प्रत्येक भाजी १० ते १५ किलो रोज विकली जाते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. शिवाय भाज्यांचे दरही वाढले आहेत. कांद्याचा दर प्रतिकिलो १०० रुपये आहे, तर बटाटे ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. ‘पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने बाजारात मालाची आवक घटली आहे. सध्या नेहमीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी भाज्यांचे दर वाढले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा