कल्याणमध्ये खड्ड्याचा आणखी एक बळी


कल्याणमध्ये खड्ड्याचा आणखी एक बळी
SHARES

कल्याणमध्ये खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला असून शुक्रवारी येथील गांधारी पुलावर खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी गेला आहे.


संपूर्ण प्रकार

गांधारी पुलावर खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडून कल्पेश जाधव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून जात असताना गांधारी पुलाजवळ त्याचा तोल गेला आणि तो थेट खड्ड्यात पडला. याचदरम्यान पाठीमागून येत असलेल्या ट्रकखाली सापडून त्याचा मृत्यू झाला.

कल्याणमध्ये खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत चौघांना आपले प्राण गमवावे लागले. तर शुक्रवारी गांधारी पुलावर खड्ड्यामुळे कल्पेश जाधवचा बळी गेला. कल्पेश जाधव हा कल्याणजवळील गावात राहणारा तरुण आहे.


दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये याच खड्ड्यामुळे एका महिलेचा जीव गेला होता. ही महिला दुचाकीच्या मागच्या सीटवर बसली होती. याचदरम्यान दुचाकी खड्ड्यात अडकली आणि महिला खाली पडली. दरम्यान त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला.


पाच मृत्यूनंतर सरकारला जाग

खड्ड्यांमुळे पाच जणांचा जीव गेल्यानंतर सरकारला जाग आली आहे. आता यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा