महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिस आही रस्त्यावर उभे आहेत. नागरिकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे पोलिसांमध्ये कोरोनचे प्रमाण वाढत आहे. मागील २४ तासांत ३८१ महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून ३जण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आतापर्यंत एकूण ११,७७३ महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित झाले असून १२४ जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
381 more Maharashtra Police personnel test positive for #COVID19 & 3 died in the last 24 hours, taking the death toll to 124.
— ANI (@ANI) August 13, 2020
Total cases in the police force stand at 11,773, out of which 9,416 have recovered and 2,233 are active cases: #Maharashtra Police pic.twitter.com/AazWLLlZHx
राज्यात आतापर्यंत ९४१६ महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून २२३३ पोलिसांवर सद्य घडीला उपचार सुरु आहेत. मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांवर अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात मुंबई पोलिस दलासाठी काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. या अहवालानुसार, महापालिकेचे दीड लाख कर्मचारी पोलिसांप्रमाणेच कोरोना योद्धांचे कर्तव्य बजावत आहेत. त्यात चतुर्थ श्रेणी कामगार व वैद्यकीय अधिका-यांचाही समावेश आहे. या दीड लाख कर्मचा-यांमागे १०८ कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या तुलनेत ४६ हजारांच्या मुंबई पोलिस दलातील ५३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शारिरीक तंदुरुस्तीतील कमतरता हे त्याचे प्रमुख कारण आहे.
हेही वाचा ः-रेल्वेची खाजगिकरणाकडे वाटचाल, आता मुंबईतही धावणार खाजगी ट्रेन
मुंबई पोलिसच्या सशस्त्र पोलिस दलात सर्वाधीक म्हणजे ९८४ पोलिसांना कोरोची बाधा झाली आहे. पण तेथे केवळ एकच आहे. त्याच्या तुलनेत वाहतुक विभागात १९७ पोलिसांना कोरोनाची बाधी झाली होती. त्यातील सात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण १३ टक्के आहे. सशस्त्र पोलिस दलात तरुणांचा भरणा असल्यामुळे त्यांनी लवकर कोरोनावर मात केले. तुलनेत वाहतुक पोलिस दलात वयस्कर पोलिस व त्रासदायक कामांमुळे तेथे मृतांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अधिक जोखीमिची कामे तरुणांना अधिक द्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय एकावेळी संसर्ग क्षेत्रांत तैनात राहिल्यामुळे कोरोना लागण होण्याची शक्यता कमी आहे. वारंवार अशा संपर्कात आल्यामुळे कोरोना होण्याची शक्यता अधिक लक्षात घेता.
हेही वाचाः-गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
३५ ते ४० वर्षांवरील पोलिसांना अधिक जोखमेचे व कमी जोखिमीची कामे आलटुन पालटून द्यावी. विषाणू संपर्क क्षेत्रातील कर्तव्यानंतर शरीराची प्रकृती सुधारण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा विश्रांती कालावधी देणे आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच वाहतुक पोलिसांचे त्रासदायक काम लक्षात घेता तेथे तरुण पोलिसांची नियुक्ती करावी, अशी शिफारही या सर्वेक्षणात करण्यात आहे.