ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्द

ई-चलन न भरलेल्या जवळपास २ हजार जणांचे वाहन परवाने आरटीओकडे रद्द करण्यासाठी पाठवले आहेत.

ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्द
SHARES

मुंबई बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागावी म्हणून मुंबईच्या वाहतूक विभागाने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत नियम मोडल्यानंतर नागरिक आणि पोलिसांमध्ये होणारा वाद रोखण्यासाठी ई-चलन ही सेवा कार्यरत करण्यात आली. मात्र बहुतांश नागरिक ई-चलन भरत नसल्यामुळे त्यांच्या वाहतूक विभागाने एक मोठे पाऊल उचचले आहे. ई-चलन न भरलेल्या जवळपास २ हजार जणांचे वाहन परवाने आरटीओकडे रद्द करण्यासाठी पाठवले आहेत. त्याचसोबत वाहन चालकाने त्यांचा वाहन परवाना का रद्द होऊ नये याबद्दल ही स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले आहे.

हेही वाचाः- सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार

सद्यच्या घडीला ई-चलन प्राप्त करण्याचा रेट ३० टक्के आहे. मात्र पुढील सहा महिन्यात तो ५० टक्के असू शकतो असे ट्राफिक सहआयुक्त यशस्वी यादव यांनी म्हटले आहे.  राज्याचे वाहतूक आयुक्त अविनाशा धानके यांनी असे म्हटले आहे की, जर वाहन धारकाने तीन किंवा त्याहून अधिक ई-चलनाची रक्कम भरली नसल्यास त्याता वाहतूकीचा परवाना आरटीओकडून तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द केला जाऊ शकतो. मात्र काही गंभीर प्रकरणात वाहन परवाना दीर्घ काळासाठी रद्द केला जाऊ शकतो. त्याचसोबत वाहतूक मालकाशिवाय गाडी चालवणाऱ्या एखादा व्यक्ती नियम मोडू शकतो असे ही धानके यांनी म्हटले. पण यासंदर्भात नोटीस थेट मालकालचा पाठवली जाते. ऐवढेच नाही तर काहीजण खोटा पत्ता किंवा चुकीचा मोबाईल क्रमांक सुद्धा देतात. अशावेळी ई-चलन पाठवणे कठीण होते असे आरटीओ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः- मुंबई खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, सराईत दरोडेखोर अटकेत

 यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये एखाद्यावेळी वाहन परवाना जप्त केल्यानंतर वाहनाच्या मालकाकडून पोलिसांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली जायची. त्यामध्ये ते असे कारण द्यायचे की, वाहन परवाना हरवला आहे किंवा नव्या वाहन परवानासाठी अर्ज केला आहे. मात्र आता सर्व डेटा हा सेन्ट्रलाइज्ड सर्वरवर अपलोड केला असून तो आरटीओसह पोलीस सुद्धा एक्सेस करु शकतात. त्यानुसार वाहनधारकानाचा परवाना कायमचा रद्द करायचा की नाही याबद्दल पोलीस तपास करणार आहेत. त्याचसोबत त्या वाहनधारकावर किती रुपयांचा दंड आहे हे सुद्ध तपासून पाहिले जाणार आहे.


वाहतूक विभाग 'कॉल सेंटर' सुरु करणार

राज्यातील वाहतूक विभागाकडून लवकरच कॉल सेंटर सुरु करण्यात येणार आहे. जेणेकरुन या कॉल सेंटरच्या माध्यमातून वाहन चालकांना त्यांनी ई-चलनाची रक्कम भरली नसल्याचे सांगितले जाणार आहे. तसेच अधिक चलनाची रक्कम न भरलेल्या व्यक्तीच्या घरी पोलीस येणार असून त्यांना शांतपणे ई-चलन भरण्यास सांगणार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या नावे जर ई-चलन आल्यास तो त्यापासून पळ ही काढू शकत नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा