Advertisement

‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी- सुभाष देसाई

मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे, याची माहिती ग्रंथ किंवा प्रदर्शनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केली.

‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी- सुभाष देसाई
SHARES

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करतच आहे. याखेरीज मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे, याची माहिती ग्रंथ किंवा प्रदर्शनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केली.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे तसंच विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीधर दीक्षित यांनी सुभाष देसाई (subhash desai) यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

मराठी नेमकी कशी?

यावेळी, मराठी माणसांना अभिजात मराठीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. परंतु ही अभिजात मराठी नेमकी कशी आहे, याची माहिती सर्वसामान्यांना मिळत नाही. ती विविध माध्यमांतून सर्वसामान्यांना उपलब्ध झाली पाहिजे. महाराष्ट्री (maharashtra) प्राकृत ते मराठी अशा उत्क्रांती साखळीची सर्वांना ओळख झाली पाहिजे. विविध माध्यमांद्वारे मराठी भाषेचं मूळ जनतेपर्यंत पोहोचविलं पाहिजे अशी सूचना सुभाष देसाई यांनी केली.

हेही वाचा- भारताबाहेरील मराठी माणसांसाठी स्पर्धा; जर्मनी, द. कोरिया, सिंगापूर, अमेरिकेतील स्पर्धक ठरले विजेते

बोली भाषेतील शब्द नव्या पिढीसाठी रुढ झाले पाहिजेत, यासाठी त्याचा वापर लेखन, पटकथा तसंच मालिकांमध्ये झाला पाहिजे, असंही सुभाष देसाई म्हणाले.

यावेळी श्रीधर दीक्षित यांनी विश्वकोष मंडळाची पुढील वाटचाल आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, विश्वकोषाचं काम ग्रामीण भागापर्यंत पोहचविलं जाईल. ज्ञानाचं लोकशाहीकरण करण्यावर विशेष भर दिला जाईल. विश्वकोषातील माहिती नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली जाईल. पारंपरिक पद्धत आणि आधुनिक माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पुरविण्यात येईल. येत्या काळात २१ कोषांप्रमाणे कुमारकोष काढण्याचा मानस असल्याचे श्रीधर दीक्षित यांनी स्पष्ट केलं. खंड अद्ययावतीकरण, तपशील तपासणे, आक्षेपार्ह बाबींमध्ये दुरूस्ती करण्याचा मानस असल्याचंही श्रीधर दीक्षित यांनी स्पष्ट केलं. अध्यक्ष डॉ.मोरे यांनी त्यांच्या निवडीबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा