नापास झालेल्या किंवा काही कारणास्त्व नियमित शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी २५ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळानं १० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं खासगीरित्या अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. यामुो अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी दहावी आणि बारावी मिळून सुमारे १ ते २ लाख विद्यार्थी १७ क्रमांकाचा फॉर्म भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्यानं नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरणं अनिर्वाय राहणार असून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. हा अर्ज स्वीकारण्याची तारीख ३० जुलै ते २५ ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.
मात्र काही कारणास्त्व या कालावधीत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण विभागानं १० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट काढून ११ सप्टेंबरपर्यंत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या शाळा, काॅलेजांमध्ये जमा करण्याच्या सूचना शिक्षण मंडळानं दिल्या आहेत.
दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना http://form17.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर, तर बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना http://form17.mh-hsc.ac.inया वेबसाईटवर अर्ज भरता येणार आहे.
हेही वाचा-
अकरावी प्रवेश: 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीसाठी ७६ हजार जागा
आयटीआयला विद्यार्थ्यांची वाढती पसंती