Advertisement

बिग बॉस मराठीत टास्कवरून वाद

बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याने त्यांना वाटणाऱ्या सदस्याला घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट केलं. यामध्ये अनिल थत्ते, रेशम टिपणीस आणि पुष्कर जोग हे पहिल्या तीन मध्ये टॉप ५ मध्ये आले आहेत. जुई गडकरीच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे.

बिग बॉस मराठीत टास्कवरून वाद
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सोमवारी पार पडली. यावेळी प्रत्येक सदस्याने त्यांना वाटणाऱ्या सदस्याला घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट केलं. यामध्ये अनिल थत्ते, रेशम टिपणीस आणि पुष्कर जोग हे पहिल्या तीन मध्ये टॉप ५ मध्ये आले आहेत. जुई गडकरीच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे. या नॉमिनेशन प्रक्रियेमुळे रेशम टिपणीस हिला खूप मोठा धक्का बसला आहे. घरामधील सदस्य नक्की काय गेम खेळतात आणि त्यांचा स्वभाव कळत नसल्याचं मत तिने व्यक्त केलं. नवीन दिवशी स्पर्धकांना बिग बॉस एक नवा टास्क देणार आहे? या टास्कमुळे पुढे काय होईल? कोणामध्ये मतभेद होतील? भांडण होतील? गैरसमज होतील? आणि या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? हे बघणे उत्सुकतेचं असणार आहे.


'खुर्ची सम्राट'

घरातील सदस्यांना दर दिवशी वेगवेगळे टास्क मिळत असतात. आज देखील त्यांना एक नवा टास्क मिळणार असून या टास्कचं नाव “खुर्ची सम्राट” असं आहे. या टास्कनुसार जी टीम त्या खुर्चीवर बसेल त्या टीमला कुठल्याही प्रकारचा शारीरिक स्पर्श न करता, पाणी न टाकता खुर्चीवरून खाली उतरवायचं आहे. या टास्कदरम्यान मेघाने स्मितावर लिस्टरीन टाकलं आणि यामुळे स्पर्धकांमधील वादाला सुरुवात झाली.


मेघाला राग अनावर

राजेश, सुशांत, रेशम आणि भूषण यांनी मेघावर निशाणा साधला आणि तिला बरेच बोलले. हे भांडण विकोपाला गेलं. मेघाने सुशांतची माफी मागूनसुद्धा सुशांतने तिला माफ केलं नाही. यामुळे मेघाला राग अनावर झाला आणि तिने इतरांसाठी म्हणजेच घरामध्ये पडलेल्या ग्रुपला हे सांगितलं की, मी त्यांच्यासाठी जेवण बनवणार नाही. यावर रेशम टिपणीसने देखील मेघाला उलट उत्तर दिलं. राजेशचं म्हणणे त्याने रेशमकडे व्यक्त केलं की, त्याला चांगली प्रकारची स्पर्धा करण्यात इच्छा आहे असं नाही. यावेळी रेशमने राजेशची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला.


यांनी टास्कमधून घेतली माघार

या टास्कवरून बिग बॉसच्या घरामध्ये बरीच भांडणं झाली. रेशम, राजेश, आस्ताद, भूषण यांनी टास्कमधून माघार घेतली. आता या स्पर्धकांच्या निर्णयावर बिग बॉस काय सांगतील? याचे परिणाम कोणाला भोगावे लागतील? कारण कुठल्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झालं तर या घरामध्ये बिग बॉस त्या स्पर्धकाला शिक्षा देण्यास समर्थ आहे, कुठल्याही स्पर्धकाने कुठलाही खेळ असा अर्धवट सोडणे खेळाडूपणाचे लक्षण नव्हे. त्यामुळे बिग बॉसचा निर्णय काय असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.


हेही वाचा - 

अास्ताद झाला बिग बॉसच्या घरातील कॅप्टन

बिग बॉसने दिली यज्ञाची आज्ञा!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा