Advertisement

बिग बॉसने दिली यज्ञाची आज्ञा!


बिग बॉसने दिली यज्ञाची आज्ञा!
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील सुरुवात तशी शांततेत झाली. पण पुढच्या दिवसातच प्रत्येकाचे खरे स्वभाव आता बाहेर आले आहेत. मेघा आणि जुईची किचनमधील धम्माल मस्ती बघायला मिळणार आहे. त्यातच बिग बॉसने घरातील नॉमिनेट सदस्यांसाठी प्रार्थना यज्ञाची घोषणा केली. नॉमिनेट सदस्यांना सदिच्छा देण्यासाठी हा यज्ञ आयोजित केला. हा टास्क रात्रभर चालला.



आणि आस्ताद भडकला....

आस्ताद काळेने हा टास्क उत्तमरीत्या पार पाडून बाजी मारली. त्याच्या बरोबर पुष्कर जोग, भूषण कडू यांनी देखील चांगल्या प्रकारे हा टास्क पार पाडला. या टास्कच्या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये आस्ताद काळेने केलेल्या आरोपामुळे मेघाला खूपच वाईट वाटले आणि तिला रडू कोसळले. कारण, आस्तादचे म्हणणे आहे, कि मेघाने आम्हाला प्रोत्साहन न देता ती निघून गेली. आस्तादने मेघावर नव्हे तर संपूर्ण टीम वर आपली नाराजी व्यक्त केली.



तिघींमध्ये रंगली नॉमिनेशनची चर्चा

ऋतुजा, उषा आणि विनिता या तिघींमध्ये सकाळी सकाळी नॉमिनेशवर रंगलेली चर्चा बघायला मिळणार आहे. उषा नाडकर्णी त्यांना कोणी कोणी नॉमिनेट केले आहे हे सांगणार आहेत. अनिल थत्ते यांनी स्वत:ला बिग बॉसच्या घरातील नारद मुनी म्हंटले, कारण त्यांना प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. तसेच ते आरती मनाने चांगली असल्याचे तसंच मेघाने आयुष्यामध्ये खूप काही सहन केल्याचे बिग बॉसला सांगणार आहेत.


सई आणि पुष्करमध्ये होतेय मैत्री

सई लोकूर आणि पुष्कर मध्ये चांगली मैत्री होत असल्याचे प्रेक्षकांना बघायला मिळणार असून, घरामध्ये फक्त पुष्करला ती आपल्या मनातील गोष्टी सांगू शकते असे देखील पुष्करला सांगणार आहे. तसेच सई पुष्करला सुशांत शेलारवर ती नाराज असल्याचे सांगणार आहे. पण नक्की असे काय घडले? ती का नाराज आहे? आस्ताद उषा नाडकर्णींवर का चिडला? हे प्रेक्षकांना गुरूवारच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे.


हेही वाचा

बिग बॉसच्या घरातील ६ बोटांचा किस्सा काय?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा