मागील आठवड्यात मान्सूनचं आगमन होऊन संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) चांगला पाऊस झाला. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण मंगळवारपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मंगळवारी उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत (mumbai) पावसानं विश्रांती घेतली आहे. पण आज पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीचा (Very Heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसंच मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
District wise weather warnings issued by IMD Mumbai today for 5 days. Pl see @RMC_Mumbai pic.twitter.com/8kQUaxJNkj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 15, 2021
बुधवारी १६ जून रोजी सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बुधवारी मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -