Advertisement

बिल्डरांकडून सवलतींचा पाऊस, तर वाहन खरेदीतही वाढ


बिल्डरांकडून सवलतींचा पाऊस, तर वाहन खरेदीतही वाढ
SHARES

मुंबई - एक बंगला बने न्यारा असे म्हणत प्रत्येक आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहतो आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो. त्यामुळे आयुष्यातील सर्वात महत्त्वाची अशी गृहखरेदी करण्यासाठी अनेकजण एक शुभ मुहुर्त शोधतात. अशावेळी गुढीपाडव्याचा मुहुर्त अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी गृहखरेदी, गृहनोंदणी, गृहताबा, गृहप्रवेश अशा व्यवहारांना चालना मिळते आणि मालमत्ता बाजारपेठे तेजीची गुढी उभारली जाते.

भारतीय मानसिकतेनुसार सोने, गाडी, इलेक्ट्राँनिक्स वस्तू आणि गृहखरेदीसाठी दसरा, पाडवा, अक्षय्य तृतीया आणि गुढीपाडवा असे साडे तीन मुहुर्त शुभ मानले जातात. गुढी पाडवा म्हणजे हिंदु नववर्षाची सुरूवात. त्यामुळे गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर गृहखरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या संधीचा फायदा घेत बिल्डरही सवलतींचा पाऊस पाडतात. यंदाही बिल्डरांनी गृहप्रकल्पावर अनेक सवलती देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार काही बिल्डरांनी सेवा शुल्क आणि इतर शुल्कावर सुट वा शुल्क माफ केले आहे. तर काही बिल्डरांनी घरांच्या किमतींवर सवलती जाहीर केल्या आहे तर काहींनी भेटवस्तूंचा पाऊल पाडला आहे. चांदी-सोन्यांच्या नाण्यांपासून एसी,एलईडी, मॉड्युलर किचन भेटवस्तू म्हणून जाहीर केल्या आहेत. इतकेच नव्हे तर मोफत कारही ऑफर केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. असे असले तरी दसरा, पाडावा, अक्षय्य तृतीया आणि गुढी पाडवा अशा साडे तीन मुहुर्तावर मात्र मंदीत चाललेल्या मालमत्ता बाजारपेठेला थोडी का होईना पण उभारी येते अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य आनंद गुप्ता यांनी दिली आहे. गृहनोंदणी, गृहखरेदी, गृहताबा अशा व्यवहारांमध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे गृहखरेदी-विक्रीतही वाढ होते. हा मुहुर्त जसा ग्राहकांसाठी शुभ असतो तसा आमच्यासाठीही शुभ असतो, त्यामुळे या शुभ मुहुर्तावर नव्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्याकडे आमचा कल असल्याने या दिवशी नव्या प्रकल्पांचा शुभारंभही मोठ्या संख्येने होतो, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान घरखरेदीसोबत वाहन खरेदीही या दिवशी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यंदाही मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी वाहन खरेदीला पसंती दिली. त्यामुळेच अनेक कंपन्यांकडून वाहनांवर आकर्षक सूटही देण्यात आली आहे. आरटीओच्या नोंदनीनुसार अनेकांनी गाडी खरेदीसाठी गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त धरला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या सोमवारी ताडदेव आरटीओ , वडाळा आरटीओ ऑफिस आणि पूर्व उपनगर मध्ये झालेल्या नोंदणीप्रमाणे 1530 गाड्यांची नोंद झाली आहे. आणि विशेष म्हणजे 1137 गाड्यांची नोंद झाली आहे. नोंद करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 963 बाईक्स आणि 430 कार चा समावेश आहे. त्याचबरोबर वडाळामध्ये 913 बाईक्स आणि 224 कार रजिस्टर करण्यात आल्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा