मुंबईत आता कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटू लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या घटण्याबरोबरच मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल २२९ दिवसांवर पोहोचला आहे. तसंच मुंबईतील कोरोनावाढीचा दर ०.३० टक्क्यांवर आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के झाला आहे.
दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.
मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त
मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी