कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्यसेवा देखील अपुरी पडत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन देखील आता कमी पडू लगला आहे. अनेक रुग्णालयांमधील ऑक्सिजन सेवा विस्कळीत झाली आहे.
कोव्हिडची साथ बघता राज्यातला १०० टक्के ऑक्सिजन आरोग्य सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सध्या दिवसाला ९५० ते १००० टन ऑक्सिजन राज्यात वापरला जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असूनही आतापासूनच राज्यात काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे.
महाराष्ट्रात मुंबईजवळचं तळोजा, पुणे आणि नागपूर अशा मोजक्याच ठिकाणी द्रवरुपातील ऑक्सिजन तयार केला जातो. पण तिथून तो इतर शहरांमध्ये पोहोचवण्यास वेळ लागतो.
हेही वाचा