Advertisement

वर्षाअखेरीस 'हे' जिल्हे १००% प्रथम डोसचे लक्ष्य पूर्ण करतील

मुंबई आणि पुणे हे दोनच जिल्हे आहेत ज्यांनी अंदाजे प्रौढ लोकसंख्येच्या १०० टक्क्यांहून अधिक लोकांना किमान एक डोस दिला आहे.

वर्षाअखेरीस 'हे' जिल्हे १००% प्रथम डोसचे लक्ष्य पूर्ण करतील
(Representational Image)
SHARES

महाराष्ट्रातील ३६ पैकी ५ जिल्हे वर्ष संपण्यापूर्वी १०० टक्के लोकसंख्येला पहिला डोस देण्याचे लक्ष्य गाठण्यात सक्षम होतील, असं पालिकेच्या एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्रानं ८६ टक्के लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.

मात्र, २२ जिल्हे अद्याप ही टक्केवारी पार करू शकले नाहीत. मुंबई आणि पुणे हे दोनच जिल्हे आहेत ज्यांनी अंदाजे प्रौढ लोकसंख्येच्या १०० टक्क्यांहून अधिक लोकांना किमान एक डोस दिला आहे. त्यांची संख्या अनुक्रमे १०६ टक्के आणि १०३ टक्के आहे.

त्यांच्या व्यतिरिक्त, भंडारा आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे त्या टप्प्यावर पोहोचू शकतील, ज्यांनी त्यांच्या पात्र लोकसंख्येच्या जवळपास ९६ टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ही संख्या गाठण्यासाठी भंडारा आणि सिंधुदुर्गला येत्या १० दिवसांत अनुक्रमे ३७,००० आणि २६,००० लसीकरण करणे आवश्यक आहे.

जानेवारीपासून महाराष्ट्रात एकूण १२.७७ कोटी कोरोनाव्हायरस लसीचे डोस देण्यात आले आहेत. याचे स्वरूप, ७.८७ कोटी हे पहिले डोस आणि ४.८९ दुसरे डोस आहेत. शिवाय, खात्यांनुसार, ११ जिल्ह्यांनी ९० टक्क्यांहून अधिक लसीकरण केले आहे.

दुसरीकडे, इतर पाच जिल्ह्यांनी ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण केलं आहे. जवळपास १६ जिल्ह्यांमध्ये ७० ते ७८ टक्के लसीकरण केले आहे.



हेही वाचा

अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनमुळे लॉकडाउनची परिस्थिती : चहल

नवी मुंबईतल्या शेतकरी विद्यालयातील १८ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा