सध्या दुरसंचार कंपन्यांमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी शर्यत रंगली आहे. तसंच, अनेक कंपन्या आपल्या सेवांच्या शुल्कात वाढ करत आहेत. व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’नं शुल्कात वाढ केली आहे. ही वाढ ३ डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंतकरण्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जियो’नं देखील शुल्कात वाढ केली आहे.
सध्या मुंबईतील ग्राहकांचं लोकप्रिय असलेल्या ‘रिलायन्स जियो’च्या सेवेच्या शुल्कातही ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्के दरवाढी होणार आहे. याबाबत कंपनीनं घोषणा केली असून, यामुळं मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेनं कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत.
हेही वाचा -
मुंबईत 'इतके' दिवस १० टक्के पाणीकपात
सत्ता गेल्याने फडणवीसांनी ४० हजार कोटीचा निधी केंद्राला परत पाठवला