Advertisement

राज्यातलं सरकार अस्थिर करण्यात भाजपला रस नाही, ते अंतर्विरोधातूनच पडेल- देवेंद्र फडणवीस

सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचं लक्ष इतरत्र वळविण्यासाठी आघाडी सरकारकडूनच अशा बातम्या दिल्या जात आहेत.

राज्यातलं सरकार अस्थिर करण्यात भाजपला रस नाही, ते अंतर्विरोधातूनच पडेल- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे, असा सत्ताधाऱ्यांकडून आरोप होत आहे. परंतु सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचं लक्ष इतरत्र वळविण्यासाठी आघाडी सरकारकडूनच अशा बातम्या दिल्या जात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

केंद्र सरकारकडून निधी मिळत नाही, असा सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडून दावा करण्यात येत आहे. परंतु या दाव्यात कुठलंही तथ्य नाही. याचा खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडूनआतापर्यंत महाराष्ट्र सरकारला किती रुपयांचा निधी कुठल्या कारणांसाठी देण्यात आला आहे. याची सविस्तर माहितीच उपलब्ध करून दिली. फडणवीस यांनी आॅनलाइन पत्रकार परिषद घेत कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत राज्य सरकारला दोषी धरलं. तसंच राज्य सरकार कोरोनावरून सर्वसामान्यांचं लक्ष हटवण्यासाठीच अशा बातम्या पसरवत असल्याचा दावा देखील केला. 

हेही वाचा - राहुल गांधी अपयशाचं सगळं खापर शिवसेनेवर फोडताहेत- देवेंद्र फडणवीस

२८ हजार कोटी रुपये दिले

केंद्र सरकारने वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ठाकरे सरकारला २८ हजार १०४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तरीही राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ झाली आहे. आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. सोमवारी केवळ २९०० चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी ३२ टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.  

राहुल गांधींवर टीका

शिवाय राहुलगांधी यांच्या वक्तव्यावर टीका करताना, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं विधान अतिशय गंभीर असून ते स्वत:च्या जबाबदारीपासून पळ काढणार विधान आहे.  कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सापडलेला असताना काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून अपशयाचं संपूर्ण खापर मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचं त्यांच्या विधानावरून दिसून येतं, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राहुल गांधी याच्या वक्तव्यावरून आता महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. 

हेही वाचा - म्हणून शरद पवार गेले मातोश्रीवर, त्यांनीच केला खुलासा…

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा