Advertisement

भाजपा सरकारचा कारभार म्हणजे दांभिकपणाचा कळस - सचिन सावंत


भाजपा सरकारचा कारभार म्हणजे दांभिकपणाचा कळस - सचिन सावंत
SHARES

एकीकडे पंतप्रधान जनतेला गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन करतात, राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांनी कर्जमाफी नाकारावी असे सांगतात, मात्र त्यांच्याच सरकारमधील मंत्री स्वतःच्या मुलीसाठी शिष्यवृत्ती योजनेचा गैरफायदा उठवत आहेत. यातून भाजपा सरकारचा दुटप्पीपणा आणि दांभिकपणा स्पष्टपणे दिसून येत असून त्याग केवळ जनतेने करावा आणि भोग मंत्र्यांनी घ्यावा, अशी सरकारमधील परिस्थिती असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना सरकारने अनेक जाचक अटी आणि शर्ती टाकल्या आहेत. या कर्जमाफी योजनेतून जिल्हा परिषद आणि महापालिकेचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी संस्था तसेच मजूर संस्थांमधील छोट्या राजकीय कार्यकर्त्यांनाही वगळले आहे. अनेक लहान शासकीय नोकर तसेच निमशासकीय संस्थाच्या कर्मचाऱ्यांनाही वंचित ठेवण्यात आले आहे. यामागे मुख्यमंत्री हे राज्यातील सधन शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळायला नको, असा गाजावाजा करत आहेत.
असे असताना आज महाराष्ट्रातील गुणी आणि गरजू मुलांकरता परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती ही सरकारमधील एका मंत्र्यांच्या मुलीला आणि सचिवांच्या मुलाला मिळत आहे. याच्यापेक्षा या सरकारचा दांभिकपणा आणि दुटप्पीपणा असू शकत नाही.
सरकारने राज्यातील गुणी आणि गरजू विद्यार्थ्यांना निवडून त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा असताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि त्या विभागाचे सचिव स्वतःच्या मुला-मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देत आहे. हा सर्व प्रकार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा आहे. निश्चितपणे ही बाब दुर्दैवी आणि निषेधार्ह असून या प्रकरणाचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.


हेही वाचा - 

भाजपाकडून काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न - सचिन सावंत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा