Advertisement

महाराष्ट्राला अतिरिक्त अनुदान द्या, शरद पवारांची केंद्राकडे मागणी

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाकडे पाहता केंद्र सरकारने राज्यांना योग्य ते आर्थिक साहाय्य केलं पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राला अतिरिक्त अनुदान द्या, शरद पवारांची केंद्राकडे मागणी
SHARES

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लाॅकडाऊनचा परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. रोजगाराच्या संधी खुंटल्या आहेत, अशा स्थितीत भविष्यातील आर्थिक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाकडे पाहता केंद्र सरकारने राज्यांना योग्य ते आर्थिक साहाय्य केलं पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.  

लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. महाराष्ट्राच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात अंदाजे ३,४७,००० कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा होती. परंतु अंदाजित महसूल नेहमीच्या अपेक्षेत साधारणतः ४० टक्के आहे. सुधारित अंदाजानुसार अपेक्षित महसुलाची तूट १,४०,००० कोटी इतकी असेल. राज्याच्या वित्तपुरवठ्यात मोठी पोकळी निर्माण होत असल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा भांडवली खर्च भागविण्यासाठी ५४,००० कोटींचं कर्ज घेण्याची योजना आखली गेली आहे. यावरून राज्य सरकारला प्रस्तावित प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या संकट काळात राज्यांना योग्य ती आर्थिक मदत दिली पाहिजे. तर आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी महाराष्ट्राला अतिरिक्त अनुदानही दिलं पाहिजे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा - सध्या तरी ट्रेन सुरू होणार नाहीच, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी जवळपास सर्वच देशांनी जीडीपीच्या जवळपास १०% आर्थिक पॅकेजेस जाहीर केली आहेत. अशा प्रकारे, आरबीआयसह भारत सरकारकडून राज्यांना योग्य आर्थिक पॅकेज देण्यासाठी वाव आहे. अगतिक व असहाय्य वित्तीय संस्था, व्यवसाय आणि इतरांसाठी केंद्राने पॅकेजेस जाहीर केली गेली त्याचं स्वागतच आहे. मात्र अशीच आर्थिक पॅकेजेस राज्यांना मिळणं आवश्यक आहे.

  • भारतीय अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी देण्यात राज्यांची प्रमुख भूमिका असेल आणि जर कोणतीही मदत  मिळाली नाहीत तर  केंद्र सरकार अर्थव्यस्थेला उभारी देण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, त्यात राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत.
  • तूटीचा वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारला फारशी अडचण असू नये. राज्यांनी कर्ज घेण्यापेक्षा  केंद्र सरकारने कर्ज घेणे अधिक कार्यक्षम आणि रास्त होईल, असं वाटतं. 
  • ही बाब लक्षात घेतल्यास सार्वजनिक व्यय कमी करणे हा पर्याय असू शकतो, परंतु हे धोरण तणावातल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल असू शकेल. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण तसंच इतर सार्वजनिक सेवा क्षेत्रात अतिरिक्त खर्चाची आवश्यकता निर्माण होणार आहे.
  • वरील गोष्टी लक्षात घेतल्या तर FRBM अंतर्गत कर्ज घेण्याची मर्यादा वाढविणं आणि अधिक कर्ज घेणं हे एक धोरण असू शकतं. मात्र, केवळ उधारीच्या माध्यमातून संपूर्ण उणीव भरून काढल्यास, राज्य संभाव्य कर्जाच्या खाईत ढकलले जाईल.
  • भारत सरकारने दिलेल्या एनएसएसएफ अर्थात राष्ट्रीय अल्प बचत निधी कर्जाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य दरवर्षी १०,५०० कोटी रुपयांची परतफेड करते. कर्जाच्या परतफेडीवर दोन वर्षांची मुदतवाढी विनंती केली गेली आहे. संभाव्य अर्थसंकल्पीय दरी भरून काढण्यास त्यामुळे मदत मिळेल.

असं पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

हेही वाचा - सोनिया गांधींवर टीका, अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांची नोटीस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा