मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, तसंच उपद्रवी ठरणाऱ्या व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकसभा निवडणुकीनिमित्त शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून मद्यसदृश्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३ दिवसांसाठी असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं हे आदेश संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. तसंच, २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळं निवडणूकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच निवडणुका या मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानापूर्वी आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळं मतदान प्रक्रियेदरम्यान मद्यसदृश्य पदार्थांची विक्री करण्यावर आणि मद्यबाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांचा थेट परवाना रद्द केला जातो. तसंच या काळात मद्य जवळ बाळगणाऱ्यांवर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
एअर इंडियाच 'सीटा' सर्व्हर तब्बल ५ तासांनंतर सुरू
बघा तो व्हिडिओ... 'खोटं बोल पण, रेटून बोल म्हणजे राज ठाकरे' - आशिष शेलार