Advertisement

मनसेच्या नव्या झेंड्यावरून वाद, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

जय हो फाउंडेशन, संभाजी बिग्रेड आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी ही नोटीस बजाविली आहे.

मनसेच्या नव्या झेंड्यावरून वाद, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस
SHARES

मनसे (Maharashtra Navnirman Sena) ला नवसंजीवणी देण्यासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या महाअधिवेशनात त्यांच्या मनातील पक्षाच्या झेंड्या(New Flag)चे अनावरण केले. या झेंड्यावर असलेल्या शिवरायांच्या राजमुद्रेला (Shivaji Maharaj Rajmudra)  काही संघटनांनी विरोध दर्शवला होता. मात्र संघटनांचे विरोध राज ठाकरे यांनी बाजूला झुडकारून लावले. मात्र राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आता मनसेच्या झेंड्यावर आक्षेप घेत त्यांना नोटीस बजावली आहे.   त्यामुळे मनसेचा बहुचर्चित नवीन झेंडा आता नव्या वादात अडकला आहे. या नोटीसला आता मनसे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 हेही वाचाः- औरंगाबादचं संभाजीनगर करा, शिवसेनेचा मुद्दा मनसेच्या हाती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या विशेष अधिवेशनात नव्या भूमिकेसह नव्या झेंड्याचे अनावरण केले होते. या भगव्या रंगाच्या झेंड्यात शिवरायांच्या राजमुद्रेच्या समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या विरोधात जय हो फाउंडेशन, संभाजी बिग्रेड आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी ही नोटीस बजाविली आहे. या नोटीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आल्याचे म्हटले आहे.

 हेही वाचाः- काॅलेजांमध्येही राष्ट्रगीत सक्तीचं, शिवजयंतीपासून अंमलबजावणी

मनसेचा हा नवा झेंडा मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणाविषयी बोलताना मनसेचे शिरीष सावंत यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने पाठविलेली नोटीस अद्याप आम्हांला मिळालेली नाही. राज्य निवडणुक आयोगाला आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्राची प्रत पाठविणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याचा विषय हा निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे हा विषय जर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अख्तारित येत नसेल तर तो राज्य निवडणुक आयोगाच्या कक्षेतही येणार नाही. तसेच आम्ही सर्व नियमांचे पालन करून नवा झेंड्याचे अनावरण केले आहे, असेही शिरीष सावंत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः- आता देशात जन की बातच चालणार- उद्धव ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा