राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
"कोणी काही दावा करेल, पण त्याला काही अर्थ नाही. माझा लोकांवर विश्वास असून उद्यापासून मी दौरा करणार आहे. कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन उद्यापासून लोकांमध्ये जाणार आहे" घोषणा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. कोणी काय भूमिका घेतली आहे यामध्ये न जाता आम्ही लोकांमध्येच जाऊ असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारमुक्त केल्याचा टोलाही पवारांनी पीएम मोदी यांनी लगावला.
तसेच शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकप्रकारे बंड केल्याचे सूचित केले आहे. तसेच पक्षांच्या विसंगत कोणी पाऊल टाकलं असेल, तर योग्य नाही असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर थेट भाष्य केले नाही.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
हेही वाचा