मुंबईत मेट्रोसह विविध वाहतूक सेवा सुरु होत असताना बेस्टला स्पर्धा निर्माण होत आहे. यात टिकण्यासाठी बेस्टला काळानुरुप बदलावं लागेल. इतर वाहतूक सेवा अणि बेस्टच्या सेवेत मुलभूत फरक आहे. बेस्ट गल्लीबोळात जाते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करतानाच बेस्टच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून सर्व प्रकारची ताकद दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिलं.
मुंबईतील वडाळा येथील बेस्ट उपक्रमाच्या अद्ययावत बस नियंत्रण कक्षाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याला पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, बेस्ट उपक्रमाचे अध्यक्ष प्रविण शिंदे, अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपली बेस्ट प्रवासी सेवेमध्ये नावप्रमाणे बेस्ट आहे. ऊन, वारा, पाऊस असताना बेस्टचे कर्मचारी काम करतात. पावसाळ्यात इतर सेवा विस्कळीत होतात परंतू बेस्ट सुरु असते. कोरोना संकटाच्या काळात जग लॉकडाऊन असताना जीवनावश्यक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी आपल्या हक्काची बेस्ट धावून आली. कोरोना (coronavirus) विरुद्धच्या युद्धात बेस्ट उपक्रमातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘बेस्ट’ योगदान दिलं. सध्या कोरोना संकटाच्या काळात लोकल अजून पूर्ण ताकदीने सुरु नाही. अशा परिस्थितीत प्रवासी सेवेचा मोठा भार बेस्टने उचलला आहे. त्यासाठी मुंबईकर कृतज्ञच राहतील.
बेस्ट उपक्रमाचे कमांडिंग सेंटर ही अभिनव कल्पना आहे. या नियंत्रण केंद्रामुळे बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना माहिती मिळणार आहे. त्यासाठीचे ॲप देखील उपयुक्त ठरेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा- मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉक सुरू, मुख्यालयाच्या इमारतीची सैर करण्याची संधी
अद्ययावत ‘बस नियंत्रण कक्ष’
(maharashtra cm uddhav thackeray reacts on best bus modernization)
हेही वाचा- मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका