Advertisement

कोरोनाविरुद्ध ‘हाच’ महत्त्वाचा मंत्र- उद्धव ठाकरे

कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे. रोग होऊच न देणं हा मंत्र महत्त्वाचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनाविरुद्ध ‘हाच’ महत्त्वाचा मंत्र- उद्धव ठाकरे
SHARES

कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे. रोग होऊच न देणं हा मंत्र महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. (maharashtra cm uddhav thackeray talks about door to door survey against coronavirus)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सकारत्मकता वाढत आहे. कोरोना विषाणूशी लढा देण्याकरीता आपण सर्व सुविधा उभारत आहोत. गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत. मात्र आपलं आव्हान अजून संपलेलं नाही. लॉकडाऊनच्या काळात आपण कोरोनाची लाट थोपविली होती. पण आता आपण हळूहळू सर्व व्यवहार खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. राज्यात काही लाख परप्रांतीय मजूर परत आले आहेत. 

त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसं जगायचं ते आता शिकवावं लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणं हा मंत्र महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असं दिसत आहे. २०१४ मध्ये मी शिव आरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचं प्रात्यक्षिक दाखविलं होतं. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. ही मोहीम परिणामकारक होणं गरजेचं आहे, तसं झाले तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं ‘या’ विषयावर पत्र

ऑक्सिजन टँकर्सना प्रतिबंध नाही

सध्या राज्यात १००० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होतं. मात्र गरज ५०० मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसं असलं तरी पुढील काळात आॅक्सिजनची आणखी गरज पडू शकते, असं डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं. जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावं. ऑक्सिजनचा नेमका किती उपयोग केला जातोय त्याचं दररोज ऑडिट करावं व अपव्यय टाळावा, असंही ते म्हणाले.

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील. या टँकसची वाहतूक रोखू नये तसंच दिवसा देखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी दिली.

मोबाईल ॲप विकसित

या मोहिमेसाठी खास मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं असून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्हे, तर आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदविण्यासाठी कामी येणार आहे. यातून योग्य रीतीने व जलदरीत्या विश्लेषण शक्य होईल, अशी माहिती रामास्वामी यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा