काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांना चाप दिल्यानंतर 'एएसबी' इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील परप्रांतीय कामगारांना मंगळवारी ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
मुद्यावरून गुद्यावर येण्याचा हेका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सोडताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांना चाेप दिल्यानंतर 'एएसबी' इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील परप्रांतीय कामगारांना मंगळवारी ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मराठी कामगारांना अचानक कामावरून काढल्याप्रकरणी ही मारहाण करण्यात आली असून मराठी माणसांवर अन्याय झाल्यास त्याला मनसे स्टाईलनेच जाब विचारला जाईल, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.
५० मराठी कामगारांना काढलं
अंबरनाथमध्ये 'एएसबी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवस्थापनाने गेल्या आठवड्यात ३ मराठी कामगारांना अचानक कामावरून काढून टाकलं. तर याआधी, सहा महिन्यांत जवळपास ५० मराठी कामगाारांना कोणतंही ठोस कारण न देता कामावरून काढून टाकल्याचा मनसेचा आरोप आहे. कामावरून काढण्यात आलेल्या मराठी कामागारांनी मनसेकडे धाव घेतली.
कामावर घेण्याची मागणी फेटाळली
त्यानुसार गेल्या आठवड्यात जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत या कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी केली. मात्र व्यवस्थापनानं या कामगारांचा कामगिरी योग्य नसल्याचं सांगत ही मागणी फेटाळली. व्यवस्थापन एेकत नसल्यानं आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी व्यवस्थापनाला मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला. मात्र त्यानंतरही व्यवस्थापन आठमुठं धोरण सोडत नव्हतं, असा आरोपही जाधव यांनी केला आहे.
व्हिडिओ व्हायरल
दरम्यान मंगळवारी सकाळी याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या दालनात व्यवस्थापन आणि मनसे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण ही बैठक निष्फळ ठरली. व्यवस्थापन मराठी कामगारांना परत कामावर घेण्यास तयार नसल्यानं आक्रमक झालेल्या जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी थेट 'एएसबी' कंपनीचं गेट गाठलं आणि गेटवरील परप्रांतीय कामगारांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळं आता याप्रकरणी पोलिस आणि कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
परप्रांतीयांना घेण्याचं कारण काय?
दरम्यान ही कंपनी मराठी कामगारांना काढून परप्रांतीयांना इथं आणत आहे, त्यांना इथं घरे घेऊन देत आहे. त्यातही कोणतंही ठोस कारण न देता मराठी कामगारांना काढलं जात आहे. त्यामुळं मराठी कामगारांवर होणारा हा अन्याय मनसे कदापी सहन करणार नाही. आम्ही त्यांना दोन-तीनदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण जर त्यांना समजतच नसेल तर मनसे स्टाईल दणक्याशिवाय पर्याय नव्हता, असं म्हणत जाधव यांनी मारहाणीचं समर्थन केलं आहे.
मुद्यावरून गुद्यावर येण्याचा हेका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सोडताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांना चाेप दिल्यानंतर 'एएसबी' इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील परप्रांतीय कामगारांना मंगळवारी ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मराठी कामगारांना अचानक कामावरून काढल्याप्रकरणी ही मारहाण करण्यात आली असून मराठी माणसांवर अन्याय झाल्यास त्याला मनसे स्टाईलनेच जाब विचारला जाईल, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.
५० मराठी कामगारांना काढलं
अंबरनाथमध्ये 'एएसबी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवस्थापनाने गेल्या आठवड्यात ३ मराठी कामगारांना अचानक कामावरून काढून टाकलं. तर याआधी, सहा महिन्यांत जवळपास ५० मराठी कामगाारांना कोणतंही ठोस कारण न देता कामावरून काढून टाकल्याचा मनसेचा आरोप आहे. कामावरून काढण्यात आलेल्या मराठी कामागारांनी मनसेकडे धाव घेतली.
कामावर घेण्याची मागणी फेटाळली
त्यानुसार गेल्या आठवड्यात जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत या कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी केली. मात्र व्यवस्थापनानं या कामगारांचा कामगिरी योग्य नसल्याचं सांगत ही मागणी फेटाळली. व्यवस्थापन एेकत नसल्यानं आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी व्यवस्थापनाला मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला. मात्र त्यानंतरही व्यवस्थापन आठमुठं धोरण सोडत नव्हतं, असा आरोपही जाधव यांनी केला आहे.
व्हिडिओ व्हायरल
दरम्यान मंगळवारी सकाळी याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या दालनात व्यवस्थापन आणि मनसे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण ही बैठक निष्फळ ठरली. व्यवस्थापन मराठी कामगारांना परत कामावर घेण्यास तयार नसल्यानं आक्रमक झालेल्या जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी थेट 'एएसबी' कंपनीचं गेट गाठलं आणि गेटवरील परप्रांतीय कामगारांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळं आता याप्रकरणी पोलिस आणि कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
परप्रांतीयांना घेण्याचं कारण काय?
दरम्यान ही कंपनी मराठी कामगारांना काढून परप्रांतीयांना इथं आणत आहे, त्यांना इथं घरे घेऊन देत आहे. त्यातही कोणतंही ठोस कारण न देता मराठी कामगारांना काढलं जात आहे. त्यामुळं मराठी कामगारांवर होणारा हा अन्याय मनसे कदापी सहन करणार नाही. आम्ही त्यांना दोन-तीनदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण जर त्यांना समजतच नसेल तर मनसे स्टाईल दणक्याशिवाय पर्याय नव्हता, असं म्हणत जाधव यांनी मारहाणीचं समर्थन केलं आहे.